महाराष्ट्र
‘कोव्हॅक्सीन’ घेतल्यानंतर पॅरासिटामोलची गरज नाही – भारत बायोटेक
Published
2 years agoon
By
Kokanshaktiहैदराबाद: कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सीन’ लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल व अन्य वेदनाशामक गोळ्या घेण्याची काहीही आवश्यकता नाही, असे ही लस विकसित करणाऱ्या हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीने बुधवारी स्पष्ट केले. लस घेतल्यानंतर येणारा ताप, थंडी यासारखे किरकोळ दुष्परिणाम थोपविण्यासाठी लसीकरण केंद्राकडून नागरिकांना या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात होता. पण कंपनीने लस घेतल्यानंतर या औषधांची काहीही गरज नसल्याचे ट्विटरवरून म्हटले आहे. लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल व अन्य वेदनाशामक गोळा घेण्याची कुठल्याही प्रकारची शिफारस करण्यात आली नाही.
जवळपास ३० हजार जणांवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये फक्त १० ते २० टक्के जणांमध्ये किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. पण ही सौम्य लक्षणे एक ते दोन दिवसात बरी होत असल्याने त्यासाठी कुठल्याही औषधांची गरज नाही. अन्य कोरोना प्रतिबंधक लसींसाठी पॅरासिटामोलची शिफारस करण्यात आली होती. आमच्या लसीसाठी नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
You may like
भारत-कॅनडामधील आरोप-प्रत्यारोपांचा परिणाम? शेअर बाजारात मोठी पडझड, ‘हे’ शेअर्स घसरले
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इंडिगोची खास ऑफर, सणासुदीच्या काळात हवाई प्रवास स्वस्त
नव्या संसद भवनातील दालनांचं वाटप, नितीन गडकरींना जी-31, तर अमित शाहांना कोणते दालन?
वेंगुर्ला नगरपरिषदच्या “अमृत कलश यात्रे” ला उत्स्फूर्त प्रतिसाद…
अबब! 200 MP कॅमेरा, आक्रोड फोडला तरी फुटणार नाही इतकी दणदणीत स्क्रीन; iPhone, Samsung ला तगडी स्पर्धा
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी काँग्रेस आणि भाजपकडून व्हिप जारी