शाळा, महाविद्यालयं दिवाळीनंतर सुरु? टास्क फोर्स सकारात्मक तर अजित पवारांचंही महत्वाचं भाष्य

[ad_1]

मुंबई : राज्यात कोरोनाचा (maharashtra corona) प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालयं (school and colleges) बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे कधी सुरु होणार याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे. यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आज मुंबईत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत कोरोनाची परिस्थिती बघायची. त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे. तेव्हा त्याबाबत मुख्यमंत्री आढावा घेतील, असं अजित पवार म्हणाले.

राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास कोविड टास्क फोर्स सकारात्मक

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर 20 दिवस कोरोनाची स्थिती पाहून तिसऱ्या लाटेची साधारण शक्यता पाहून यावर निर्णय घ्यावा, अशा सूचना पेडीएट्रिक टास्क फोर्सने राज्य सरकराला दिल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत आधी सुद्धा पेडीएट्रिक टास्क फोर्स सकारात्मक होते, मात्र शाळा कधी सुरू कराव्यात याबाबत त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लसीकरण पूर्ण झाल्यास व ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करण्यासाठीची तयारी पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात याव्यात असं मत मांडले होतं.

लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली

शिक्षण विभागाने आता लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली असून शाळा सुरू करब्याबाबत पूर्वतयारी सुद्धा केली जात आहे.मुंबई महापालिका शिक्षण विभागाने सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन सुरू ठेवला आहे. मुंबईत शाळा सुरू करण्याचा निर्णय हा आयुक्त घेतील आणि जर दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला तर तो सर्व बोर्डाच्या शाळांसाठी लागू असेल, अशी देखील माहिती आहे. मात्र, शाळा कधी सुरू कराव्यात ? याबाबत एकवाक्यता नसल्याने यावर टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचा विचार करून राज्य सरकार कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिली तर नक्कीच दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर जरी शाळा सुरू करण्याची शक्यता असली तरी विविध जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतील.

[ad_2]

Related Posts

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

तळेगाव दाभाडेजवळील कुंडमळा परिसरात, 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास, इंद्रायणी नदीवर असलेला एक जुना लोखंडी पादचारी पूल कोसळला. पूल कोसळण्याच्या वेळी त्यावर 50 ते 125 लोक उपस्थित…

Continue reading
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

अहमदाबाद – Ahmedabad Plane Crash News अंतर्गत आलेल्या धक्कादायक घटनेत बांसवाडा येथील व्यास कुटुंबातील पाच जणांचा जीव गेला आहे. एअर इंडियाच्या AI-171 या फ्लाईटने अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

  • By Editor
  • June 20, 2025
  • 45 views
🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

  • By Editor
  • June 18, 2025
  • 18 views
🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

  • By Editor
  • June 15, 2025
  • 16 views
🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

  • By Editor
  • June 13, 2025
  • 29 views
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

  • By Editor
  • June 12, 2025
  • 24 views
एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?

  • By Editor
  • June 12, 2025
  • 25 views
IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?