रस्त्यावर दुकाने थाटून सावंतवाडीच्या आठवडा बाजारात येणार्‍या परप्रांतीयांची दादागिरी…

[ad_1]

परिमल नाईकांचा आरोप; सत्ताधारी नसल्याने पालिकेत अधिकारी व कर्मचार्‍यांची मनमानी सुरू…

सावंतवाडी,ता.२६: आठवडा बाजारासाठी या ठिकाणी येणार्‍या विक्रेत्यांकडून दादागिरी सुरू आहे. रस्त्यावरच मंडप मारले जातात. त्या ठिकाणावरून साधी दुचाकी सुध्दा येवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पालिकेने संबंधितांना तात्काळ समज द्यावी, अन्यथा कार्यवाही करावी, परप्रांतीय व्यापार्‍यांचे लाड नको, अशी मागणी सावंतवाडी पालिकेचे माजी आरोग्य सभापती अ‍ॅड. परिमल नाईक यांनी केली आहे. दरम्यान पालिकेत गेली दोन वर्षे सत्ताधारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची मनमानी सुरु आहे. त्याचाच एक प्रकार म्हणजे मच्छीमार्केट मध्ये फुटलेल्या फरश्या दिड वर्ष बदलण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हे प्रकार बंद करावेत याकडे मुख्याधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सुध्दा त्यांनी केली आहे. याबाबत श्री. नाईक यांनी ब्रेकींग मालवणीशी संपर्क साधून माहिती दिली.

ते म्हणाले, आठवडा बाजार गोदामाच्या जागेत हलविण्यात आला. त्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. परंतु त्या ठिकाणी बाजार रस्त्यावर भरवला जातो, दुकाने मांडणार्‍या व्यापार्‍यांना मधून दुचाकीसाठी वाट ठेवावी अशा सुचना आहेत. मात्र पुर्णतः प्लास्टीक शेड घालून त्या ठिकाणी दोर्‍या लावल्या जातात. त्यामुळे तेथून ये-जा येत नाही. विचारणा केल्यानंतर व्यापार्‍यांची दादागिरी आहे. जे व्यापारी येतात त्यांचा आणि सावंतवाडीचा काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे बाजार पेठेत मिळणार्‍या वस्तू आणि आठवडा बाजारात मिळणार्‍या वस्तू यात मोठा फरक नसतो. परंतु या व्यापार्‍यांच्या माध्यमातून येथील पैसे दुसरीकडे नेेले जात आहेत. त्यामुळे हा प्रकार वेळीच आवरावा. याबाबत आपण हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संदिप निंबाळकर यांच्याशी सुध्दा बोललो. ते माझे चांगले मित्र आहेत. विरोधासाठी विरोध नाही परंतु याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले, दोन वर्षे पालिकेत सत्ताधारी नाहीत. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची मनमानी सुरू आहे. दीपक म्हापसेकर वगळता अन्य कोणी प्रामाणिकपणे काम करताना दिसत नाही तर अनेक कर्मचारी कार्यालयात मिळत नाहीत. याचा अनेकांना प्रत्यय आला आहे. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी यात शिस्तबध्दता आणावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

[ad_2]

  • Related Posts

    मुंबई–कोंकण प्रवास आता फक्त ४ ते ५ तासात! ‘रेवास–रेड्डी कॉस्टल हायवे’ बनेल कोंकणातील खेळ बदलणारा प्रकल्प 🚀

    कोंकण, ८ जून २०२५ – मुंबई ते सिंधुदुर्ग असा सुमारे ४०० किमीचा प्रवास आता फक्त ४ ते ५ तासांत साध्य होणार आहे. हे शक्य करणारा ‘रेवास–रेड्डी कॉस्टल हायवे’ (MSH‑4) प्रकल्प…

    Continue reading
    मालवण: कोकण किनारपट्टीवरील नयनरम्य ठिकाण (Malvan: Kokan Kinarpattiwaril Nayanramya Thikana)

    महाराष्ट्राच्या नयनरम्य कोकण किनारपट्टीवर वसलेले मालवण हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. स्वच्छ निळे समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, आणि रुचकर सी-फूडसाठी मालवण हे नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. जर तुम्ही शांत आणि…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

    • By Editor
    • June 20, 2025
    • 43 views
    🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

    🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

    • By Editor
    • June 18, 2025
    • 18 views
    🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

    🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

    • By Editor
    • June 15, 2025
    • 16 views
    🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

    Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

    • By Editor
    • June 13, 2025
    • 29 views
    Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

    एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

    • By Editor
    • June 12, 2025
    • 24 views
    एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

    IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?

    • By Editor
    • June 12, 2025
    • 25 views
    IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?